सीमेवरल्या लढाया क्रिकेट सारख्या असत्या जर …
नसती कुठलीच बॉर्डर, असत्या केवळ बाऊन्डऱ्या तर …
बंदूक नाही, कि नाहीत तोफा, इथे सांडत नाही रक्त…
रक्त नुसतेच खवळते यांचे, सारे आहेत क्रिकेट भक्त…
मुडद्यांची रास नाही, कि नाहीत कुणाचे चित्कार …
करतात जल्लोष सारे जेव्हा पडतात चौकार षटकार …
कुणीही हारो वा जिंको, कुणी होतो आनंदी कुणी बसतात करीत दुःख…
छिन्न-विच्छिन्न, भयाण अथवा विदिर्ण इतकं वाईट काही ते नसतं…
कुणीतरी मग उडवतोच फटाके, त्या उडल्या फटक्यांना सीमा नाहीत…
सीमेपलीकडील चिमुरडीही मग हरवतातच कि त्याच रोषणाईत…
सीमेवरल्या लढाया क्रिकेट सारख्या असत्या जर …
नसती कुठलीच बॉर्डर, असत्या केवळ बाऊन्डऱ्या तर …
~ अरुण भऊड
No comments:
Post a Comment