पांढरे ढग दबा धरून असतात घेऊन हातात निळ्या रंगांची पुडी...
सूर्य दिसताच उधळत अख्खी पुडी सारे घेतात त्यावर उडी...
सूर्यहि मग साऱ्या ढगांना घालतो केशरी पिवळ्या रंगांनी आंघोळी...
आकाशात रोज नवी उमटते एक बिन ठिपक्यांची रांगोळी
~ अरुण भऊड
Friday, May 20, 2016
पहाट...
Thursday, May 19, 2016
उशिरानेच उठलो...
रात्री गप्पा रंगत गेल्या सकाळी उशिरानेच उठलो...
लवकर आंघोळ करून ऑफिसला जाऊ म्हणत हातात ब्रश घेतला...
कळलेच नाही माझी नजर चुकवून रूममेट कधी आत शिरला...
वेळेत ऑफिसात जाण्याची आशाच सोडून बसलो... ब्रश हातात तसाच अन कवितेला भेटलो...
लग्नाच्या प्रेमात...
प्रेम म्हणजे हातावर गोंदणं...
लग्न म्हणजे उगीचचं कोंदण
प्रेमाचे ते... संबंध
लग्नाचे ते... निर्बंध
प्रेमात सारं काही अर्पण...
लग्नात केवढे दडपण
प्रेम करते मी लपून छपून...
सगळ्यांना का दाखवते लग्न करुन?
प्रेमात कसले स्वातंत्र्य...
लग्नानंतर कूठून येते पारतंत्र्य?
प्रेम कसे करावे याचे कसलेच नसते सूत्र... नाही कुठलेच शास्त्र...
लग्नानंतरच का सोबत असायला गळ्यात हवे मंगळसूत्र?
प्रेम करताना कुठे पैशावाचून अडते...
लग्नानंतरच का सततची नड भासते?
प्रेमात डेझर्ट म्हणून साधी चालते एक पेपरमेन्ट...
लग्नानंतर का तिला म्हणते मी एक अड्जस्टमेंट?
प्रेमात कसे तू मनाला वाट्टेल ते कर...
लग्नानंतर मी मुलांचं बघते तू जॉबच कर...
प्रेमात किती सहज करते मी सारे अडथळे पार...
लग्नात साधी ठेच लागली तरी तिला का म्हणते संसार?
जगाला दाखवण्यापूरतं हवं तर माझ्याशी तू लग्न कर...
आपल्या आपल्यात सततचं तू माझ्यावर प्रेमच कर...
~ अरुण भऊड
Tuesday, May 17, 2016
पेय...
पाणी नाही water म्हणतात, त्यात 'R' silent उच्चारतात
नुसतंच मिनरल वॉटर नाही आणखीण बरंच काही पितात
कुणी fresh lime soda, कुणी mocktail घेतात...
Combo meal सोबत cold drink compulsary देतात
Crush, syrup अन fruit punch काय काय विकतात...
गावाकडेही पाहुणे आल्यावर लोक आता थंडा मागवतात
कुणाला वाटते हे सारे व्यर्थ तेही स्वस्थ नाहीत बसत...
संध्याकाळ झाली कि english टाकून पडतात लोळत
उन्हातून थकून भागून आल्यावर माठातलं पाणी कितीजण मागतात...
गावाकडे गेलो कि खालच्या विहिरीचं पाणी प्यायला कोण कोण धावतात
दगडावरून खळाळतं नदीचं पाणी त्यावर पडलेली कोवळी उन्हं...
तोंड लाऊन काठाला हल्ली कितीजण चाखतात...
यांना जरा चाटवा कुणीतरी कोकमाची आगळ आणि कैरीचं पन्हं...
शहाळ्याचे पाणी देखील हे स्ट्रॉ मधून ओढतात
घरच्या म्हशींचे दूध, गाईच्या घट्ट दुधाचा खरवस...
वरण भातावरचं साजूक तूप अन पडीच्या आंब्यांचा आमरस...
हळूहळू सगळ्याचाच आता पडत चाललाय विसर
शितपेयासाठी वापरून नदीचंच पाणी चांगलंच पांग फेडतात
त्याच फॅक्टरीतलं सांडपाणी हळूच पुन्हा नदीतच सोडतात
व्यापारिकरणाच्या या बाजारात सारं सारं दुरावत चाललंय...
उरलं आयुष्य सलाईनची बाटली अन इन्सुलिन साठीच राखून ठेवलंय
~ अरुण भऊड